
नांदेड
जिल्हात झालेल्या वादळी वारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अर्धापूर तालुक्यातील केळी, आंबा, यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. केळी पपई यासारख्या नगदी पिकांना विम्याचे संरक्षण द्यावं. या पिकांना विम्याचे संरक्षण मिळाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. असे राजू शेट्टी म्हणाले.

