श्रीक्षेत्र माहूर – जयकुमार अडकीने
२०२५-२६ या खरीप हंगामात तालुक्यात मुंग उडीद पिकांचे १०० % नुकसान कायम. कापूस सोयाबीन उत्पादनात १०० % घट कायम. तूर, ,ज्वारी,भात, तीळ, पिकांचे नुकसान झाल्याचे आज रोजी धडधडित वास्तवचित्र पहावयास मिळत आहे. माहूर तालुक्यात पावसाची सरासरी १२०० ते १६०० मिलीमीटर पर्जन्यमापनात नोंद असतांना आज पर्यत १२०० च्या वर पावसाची नोंद महसूल विभागात झाली आहे. सरासरी १०० % च्या पाउस पडल्याने खरीप हंगाम आजच पूर्णतः वाया गेली आहे. माहूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६२५ हेक्टर असून त्यात लागवडीलायक क्षेत्र ३४ हजार ४०० हेक्टर आहे. २०१७-१८ या खरीप हंगामात पेरणीलायक क्षेत्र २९ हजार ९८४ हेक्टर आहे यामध्ये भात-७ हेक्टर, ज्वारी ७४३ हेक्टर, तूर २७८३ हेक्टर, उडीद ६९६.९६ हेक्टर,मुंग ५१४ हेक्टर,सोयाबीन ६ हजार ५८१ हेक्टर, कापूस २२ हजार ६२१ हेक्टर, हळद ७० हेक्टर व इतर २७३ हेक्टर इ. वरील अंदाजीत प्रमाणे खरीपात पिकनिहाय पेरा २ ऑगस्ट पर्यंत ३९४ .४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचे प्राथमिक अहवालात महसूल विभागाच् आदिवासी व डोंगराळ भागाने परिचित असतांना कोरडवाहू जमीन क्षेत्र, वनपट्टा, बंज्जर जमीन असल्याने उत्पादनात दरवर्षी घट कायम आहे. जलसिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कुचकामी धोरणाने शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्यास पुरेसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत ऐन खरिपाच्या तोंडावर पेरणी करीत असतांना निसर्गाचा लहरीपणा शासनाचे धोरण, शेतकऱ्यांना दिवसेंदिवस असंख्य अडचणींचा सामना करावा लागय कहे. – रब्बी पिकांचे १०० % नुकसान झाले असून कापूस सोयाबिन पिके १०० % उत्पादनात बाधित झाली अ असल्याने खरीप २०२५-२६ हंगामात कर्जमाफीचा सावळा गोंधळ सत्ताधारी व विरोधी पक्षांनी दूर करावा व शेतकऱ्यांची जाहीर फसवणूक करू नका असे सत्ताधारी सह विरोधी पक्षांना पण मौजे मदनापूर येथील शेतकरी नरेंद्र टनमने हडसनी येथील दीपक शिंदे, अवधूत जाधव, दिगंबर माकोडे , जयकुमार अडकीने, शिवशंकर थोटे,जितु चोले, दिलीप सुकले,अरुण राठोड, भाऊराव पेंदोर निखील शिंदे सह अन्य शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या प्रतीनिधीशी बोलतांना व्यक्त केल्या

