
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील गारगव्हाण या गावात पाय घसरून खदानीत पडल्याने दोन शाळकरी मुलांचा खदानीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील गारगव्हाण या गावात ही घटना घडली. निखिल वाढवे आणि संघर्ष पडघने असे या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोन्ही मुले नेहमीप्रमाणे शेताकडे गेले होते. शेतातून परत येत असताना या दोन्ही मुलाचा खदानीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

